Tuesday, 13 March 2018

हरवलेले बालपण आणि भरकटलेली तरुणाई

‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातील एक वाक्य आहे की “जिंदगी मे हर इन्सान को एक बार प्यार जरुर करना चाहिये, क्यूकी प्यार इन्सानको बहोत अच्छा बना देता है।” प्रेम ही एक अत्यंत सुंदर भावना आहे. प्रेमात पडल्यावर माणूस जणू एका पॉझिटिव्ह एनर्जीने भारला जातो. सगळे जग सुंदर वाटू लागते, नवी उमेद निर्माण होते. काही तरी सकारात्मक करून दाखवण्याची उर्मी बळावते. जिच्यावर प्रेम करतो तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे होऊन जाते.
व्यक्तिमत्वामध्ये अमूलाग्र बदल होतो. मुड चांगला राहतो. चेहऱ्यावर सतत एक स्मित वास्तव्य करून असते. आत्मविश्वास दुणावतो. प्रसंगी तिच्यासाठी जीवाची बाजीही लावली जाते. इतके चांगले बदल एखादी व्यक्ती केवळ आवडू लागल्यावर घडू लागतात. त्या व्यक्तीने प्रेमाचा स्वीकार केल्यावर तर आकाशच ठेंगणे होऊन जाते! मग नक्की असे काय होते की एवढे सगळे चांगले बदल झालेले असताना तिच्या एका नकारामुळे मनातील प्रेम कापरासारखे उडून जाते?

No comments:

Post a Comment

हास्य ही सहारा है

                                                                    हास्य ही सहारा है   जिंदगी हो गई है तंगदस्त और तनावों ने उसे कर ...